अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव( प्रतिनिधी)-भडगावकडून खरजई नाक्याच्या मार्गाने चाळीसगाव शहरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीची बातमी प्रसिद्ध करत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सदर माहिती पत्रकार गफ्फार शेख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार खरजई नाक्यावर महसूल विभागाचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.
सर्रास सुरू असलेल्या या अवैध वाळू वाहतुकीमुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होत असल्याची चर्चा होती.याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार खरजई नाक्यावर महसूल विभागाचे पथक तैनात करण्यात आले असून अवैध वाळू वाहतुकीवर नजर ठेवण्यात आली आहे.
यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासन पुढील काळातही अशाच प्रकारे उपाययोजना करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून अवैध वाळू माफियांवर सातत्याने लक्ष ठेवत कठोर कारवाई करून या अवैध वाळू वाहतुकीला कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
सोशल मीडियावर महसूल पथकाने एक व्हिडीओत म्हटले आहे की पोलिस प्रशासन या कारवाईत सहकार्य करत नाही ठाणे अंमलदारांना फोन लाऊन कळविले त्यांनी तात्काळ कर्मचारी पाठवितो म्हटले मात्र एक तास झाला तरी पोलिस कर्मचारी आले नाहीत,पोलिस प्रशासन असले की कारवाईसाठी बळ मिळते असे देखील त्यांनी सांगितले आहे.

